केंद्रीय भूजल बोर्डाकडून भूजल वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना ऑक्टोबरमध्ये अधिसूचित करण्यात आल्या आहेत. देशातील भूजल वापराबाबत पर्यावरणीय आणि व्यवहार्य दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणे हा या मानकांचा उद्देश आहे. याबाबत महत्त्वाच्या मुद्याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
ठळक तरतुदी
ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीचे निकष / अटी
भूजल वापर
उपाययोजना
अटल भूजल योजना
देशातील ७ राज्यांमधील अतिअवशोषित आणि जलस्रोतांवर ताण आलेल्या क्षेत्रांमध्ये लोकसहभागातून भूजल वापराचे व्यवस्थापन करणे व भूजल स्रोतांवरचा ताण कमी करणे या उद्देशाने ही योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या १३ जिल्ह्यंमधील १३३९ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्यातून राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय जलधारक मानचित्रण आणि व्यवस्थापन कार्यक्रम
केंद्रीय भूजल बोर्डाकडून मार्च २०२०पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. देशातील जलधारक खडक म्हणजे भूजल स्रोतांचे मानचित्रण, वर्गवारी करणे आणि त्यांच्या व्यवस्थापन योजनांच्या माध्यमातून भूजलाचे शाश्वत व्यवस्थापन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कृषि व्यवस्थापन
भूजल पुनर्भरण
भूपृष्ठावरील पाणी जलधारक खडकांपर्यंत झिरपावे आणि भूजल पातळी वाढावी या हेतूने जमिनीवर पाणी साठविणे किंवा पसरविणे अशा प्रक्रियेतून भूजलाचे पुनर्भरण करणे हा भूजल स्त्रोतांच्या संवर्धनाचा प्रभावी उपाय ठरतो.
आनुषंगिक मुद्दे